Posts

Showing posts from May, 2018

ऋषिकेश गंगा: : माझे आजोळ

ऋषिकेश गंगा: : माझे आजोळ शिवंजय डॉ संजय।© मानो तो गंगा माँ है। गंगा हि आई आहे child like faith ने तिच्या कुशीत गेले तर ती वात्सल्य सिंधू  आहे. मी ज्या ज्या वेळी ऋषीकेशच्या दयानंद घाटावर स्...

पावित्र्याचा महामेरू:पतितपावनी गंगा।

पावित्र्याचा महामेरू:पतितपावनी गंगा। : शिवंजय डॉ संजय।© (कै. गुर्लिंग ज्योति देशमाने,कै.जयंत हसोळकर,कै.  श्रीमती  सुमति  होनकळसे यांच्या स्मृतिस सविनय सादर समर्पित)         श्रोतसामस्मि जान्हवी , सर्व तीर्थांमध्ये मी गंगा आहे असे प्रत्यक्ष भगवान कृष्ण गीतेच्या 10   व्व्या अध्यायात म्हणतात.अशा पुरुषोत्तमरूपी गंगादर्शन व स्नानाचे महात्म्य तर नक्कीच पण पुरुषोत्तम अधिक मासात अधिकस्य फलं देणारे असे आहे.मनांत नसताना हे भाग्य मला लाभले. हे आज आता अधिक मासाच्या पहिल्या दिवशीच गंगा दर्शन झाले व आज दुसऱ्या दिवशी मी चक्क हरकी पौडीवर,जिथे भगवंताचे पृथ्वीवर पहिल पाऊल पडले,तेथे स्नान करत होतो हे चार दिवस आधी माझ्या विचार-इच्छे पलीकडे होते हे खरं वाटणारं नाही. हरीद्वार: हरिकडे जाण्या साठी हरिहरमय होण्यासाठी अस लेलं प्रवेशद्वार.अशा या हर कि पौडी मध्ये स्नान करण्याचे स्वप्न भाऊक भाविक बाळगून अस तात. हरिद्वारला अधिक मास निमित्ते गंगा स्नानास आलो आहे. येथे घाटावर म्हणजे हर कि पौडी वर स्नान करता कर ता निरीक्षणा ने लक्षांत येते कि कित्येकजण प...

भारतीय वयो व्यवस्था विचार

भारतीय वयो व्यवस्था विचार: शिवंजय डॉ संजय© (आमचे मित्र मेंजर सुशांत यांच्या आजीस सहस्तरदर्शन सोहळ्या निमित्त समर्पित।) रविवार तारीख 22 एप्रिल 2017  आंम्ही 9 साधक आसाम ,अरुणाच...

मरणांतानी वैराणी,आपली संस्कृति आपली परंपरा ।

मरणांतानी वैराणी,आपली संस्कृति आपली परंपरा । कृण्वन्तो विश्वम आर्यम।ॐ अगस्तै नम:| :  मरणांताणी वैराणी: शिवंजय डॉ संजय।drsanjayhonkalse ( नान्दी जाणीवपूर्वक मोठी केलिय ,क्षमस्व) भारतीय अध्यात्म शास्त्र व त्याच्याशी सुसंगत असे धर्मशास्त्र जीवन जगण्याचं शास्त्र आहे व ते जीवन जगण्याची कला शिकवते. याउपर ते जीवना पश्चात वर्तुणूक व व्यवहाराचा पण विचार करते. या विचार व अभ्यासाचे अनेक पैलू आहेत त्यापैकी एकविचार म्हणजे "मरणांताणी वैराणी" असं म्हणतात की  मरणोपरांत वैर संपत। इथे यावर भाष्य करणं अशासाठी लागलं की आमचे एक जिवलग यांनी शेवटचा "राम"म्हंटल्यावर त्याच्या महाविद्यालयीन सुहृदास कळवल्यावर सकारात्मक सुर दाखवावा म्हणून मी " मराणांतानी वैराणी" , अर्थात मृत्युनंतर त्या व्यक्तिशी व संबंधितांशी वैर संपते व वा संपवावे हे वाक्य सर्वांना कळवताना लिहिले असं लिहीण्याची आवश्यकता वाटली कारण नुकतेच त्यांचे तात्विक व सात्विक वाद झाल्याने थोडासा प्रेमापोटी दुरावा निर्माण झाला होता .दोघेही मलातर  जिवलगच पण एकमेकांचे जास्त सुहृद त्यांच्या महाविद्यालयीन काळापासून होते ...

काज़ीरंगा आसाम ,अरुणाचल डायरी: काज़ीरंगा जगप्रसिद्ध राष्ट्रिय उद्यान ।

काज़ीरंगा आसाम ,अरुणाचल डायरी: काज़ीरंगा जगप्रसिद्ध राष्ट्रिय उद्यान । : " शिवंजय डॉ संजय आसाम ला गेला व् कामाख्या अन काज़ीरंगा यांना भेंटी देणं म्हणजे दिल्लीला जाऊन क़ुतुब मीनार न पाहणे व आग्र्यास जाऊन  ताज महल न बघण्या सारखं आहे.  आमची  उद्देशित सर्व प्रमुख ठिकाणं पाहून दर्शन घेऊन झाले दोन दिवस अंगावर hedging साठीचे आहेत सर्वजण आनंदात आहेत. आयुष्यात  अनअपेक्षित स्वप्नातीत  ठिकाणं ,जसं परशुराम कुंड,माझ्यासकट सर्वांची झलियेत. मग काय मिशन काज़ीरंगा बोनस म्हणून केल. काज़िरंगाच्या कोहोरा येथे आकाशदीप होमस्टे मध्ये राहिलो. काझीरंगा हे जगप्रसिद्ध  राष्ट्रीय उद्यान आहे. ते   प्रचंड मोठे असून आसामच्या गोलाघाट व नागाव या दोन जिल्ह्यात आहे. 1000 स्क्वेअर   मीटर इतका एरिया व्यापून आहे. : अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय  सुंदर असे वातावरण व हवामान आहे. एक शिंगी पण गेंडा ,हत्ती व बंगाल टायगर, व पक्षी व पर्यटक पक्षी या साठी प्रसिद्ध आहे. 2513 पण गेंडे आहेत ,2400 हत्ती आहेत ,. पाणगेंडे हे सरासरी 2500 किलो इतके वजन असलेले आहेत . ते शाकाहारी असून...

नववैष्णवांच सांस्कृतिक वसतीस्थान: माजुली(Majuli /Majoli): शिवंजय संजय

आसाम ,अरुणाचल डायरी :   नववैष्णवांच सांस्कृतिक वसतीस्थान: माजुली(Majuli /Majoli): शिवंजय संजय  drsanjayhonkalse.tripod.com  परशुराम कुंड स्नान संपन्न करणे व कामाख्या दर्शन सेवा हे दोन प्रमुख हेतू साध्य झाल्यावर आम्ही सारे रिलॅक्सड आहोत. चंगळ करत आहोत. परशुराम कुंडला दिब्रूगढ ,तेजू मार्गे गेलो व वाक्रो मार्गे परतलो. दिब्रूगढला मुक्कामी राहून शिवसागर येथे आलो .शिवसागर हि आसामचे सांस्कृतिक राजधानी व तलावांचा शहर।  मग तेथून जोरहात मार्गे  माजुलीस आलो . माजुली हे जगातील सर्वात मोठे ,1250  स्क्वेर कि.मीटर व्यापलेले ,बेट आहे. 8  सेप्टेम्बर,2016 माजुली रिवर डिस्ट्रिक्ट म्हणून जाहिर झाले व् ते भारतातिल एकमेव बेत जे जिल्हा पण  गम्मत म्हणजे जगातील सर्वात छोटं मानवी वस्ती असलेले बेट हि आसाम मध्येच आहे. उमानन्द जे गोहत्तीस आहे.दोन्हीही जगातील छोटं व मोठं मानवी वस्ती असलेले बेटं एकाच नदीत तयार झालीयत.  ब्रह्मपुत्रा नदीत जी एकमेव पुरुष नदी आहे. १५ व्या शतकांत  माजुली वसवले गेलंय.संत शंकरदेव नावाच्या आसामी संताने ते वसवले.हा नव वैष्णव समाज आहे.हि आसम...

अधिक मास

अधिक मास :अधिकस्य अधिकम फलम.:© डॉक्टर संजय होनकळसे "शिवंजय" drsanjayhonkalse@gmail .com भारत हा कदाचित जगाच्या पाठीवरील एकमेव देश आहे की जेथे सभ्यता,जीवन ,संस्कृती, आरोग्य ,आयुष्यमान  ,हवामान, सण,व्रत वैकल्य, अन्न, आहारशास्त्र अगदी साज श्रुगार-वेषंभूषा  व अध्यात्म शास्त्र सुद्धा   इ अनेकानेक गोष्टींची शास्त्रीय बैठकीवर आधारीत उत्कृष्ट सांगड घातलेली आहे. पण हे सर्व  बाजूला पडून या गोष्टी परंपरा म्हणून जोपासल्या जाऊ लागल्या आहेत.अगदी छोट्या गोष्टी जस नाक कान टोचणे ,गंध लावणे इ बाबींमागे  शास्त्रीय आधार  आहे .फरक इतकाच की आधार- ज्ञान बाजूला होऊन या रीती रिवाज परंपरा म्हणून पुढे आल्या व पाश्चात्य करणाच्या( Impact of Westernization) प्रक्रियेमुळे त्यांना अंध श्रद्धा नावाच्या पोतडीत घातले जाऊ लागले.तरीही आजही आपण शास्त्राप्रमाणे अस अस करणे आवश्यक आहे किंवा शास्त्र असें सांगते अस म्हणून कित्येक परंपरा पाळतो.खरतर अज्ञानामुळे श्रद्धा बळकट न होता कमजोर झाल्या . युवकांमध्ये अत्यंत प्रचलित असलेले एक पाश्चात्य लेखक  पॉल ब्रनटन( Paul Bruntan उर्फ P B )ज्या...