श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत: कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण.
- Get link
- X
- Other Apps
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत:
कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण. डॉक्टर संजय होनकलसे : drsanjayhonkalse@gmail.com श्रीपाद चरित्र अनेक अर्थाने अद्भूत आहे, विलक्षण आहे. एकतर ते तेराव्या शतकात श्रीपादांच्या अनेक चमत्कारपूर्ण जीवन प्रवाहाबरोबरच लिहिले जात होते. श्री शंकर भट्ट ,जे या चारीत्रामृताचे लेखक होते ते कुरवपुरी श्रीपादांच्या जलसमाधी पर्यंत त्यांच्या बरोबर होते जलसमाधी नंतर श्रीपाद गुप्त होऊन अनंत कोटी ब्रह्मांडात असलेल्या अणु रेणूंमध्ये एकरूप झाले व सर्वान्तर्यामी झाले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या पादुका विधीपूर्वक स्थापित करून आपण लिहिलेले श्रीपाद चरित्र शंकर भट्ट यांनी श्रीपादांच्या आजोळी समर्पित केले. दुसरे चरित्रात अनेकानेक आध्यात्मिक व धार्मिक रहस्यांची सूक्ष्म विवरण व उकल केलेली आहे आध्यात्मिक साधकांना त्यांच्या साधनेत मदत करू शकणाऱ्या अनेक बाबींचे सरळ सोपे निरुपण केले आहे. अनेक संत महात्म्यांचे (ज्यांचे जीवनकार्य श्रीपादांच्या नंतर सुरु झाले) उल्लेख व अवतारकार्य विवरण १३ व्या शतकातच सांगून ठेवले आहे. अनेक धार्मिक सण व्रतांचे भावार्थ ,शास्त्रार्थ ,व परमार्थ सांगितला आहे.त्या प्रत्येकावर एक एक लेख होईल एवढये रहस्यभेद त्यात आहेत. आपण येथे पंच महा पतीव्रतांचे कर्म रहस्य निरुपणावर प्रकाश टाकणार आहोत. अहिल्या, द्रोपदी ,सीता, तारा, मंदोदरी तथा, | पंच कन्या स्मरे नित्यं महा पातक नाशनम|| हिंदू धर्म इतिहासात अनेकानेक पतिव्रता मान्यताप्राप्त स्थानात विराजमान आहेत. सती अनुसूया, रेणुका, इ . सती सावित्रीने तरं धर्मराज यमाला जिंकून आपल्या सत्यवानाचे प्राण परत मिळवले व असे करून पतिव्रता धर्माचे पालन केले व पतिव्रता म्ह्मणून मानाचेस्थान प्राप्त केले त्यांचे पूजनही होते तरीही तिला पाच महा पतीव्रतामध्ये स्थान मिळाले नाही. मानाचे स्थान पटकावले ते वरील पंच कन्यांनी खरे पाहता अनुसूया, सावित्री ,रेणुका यांचे चारित्र व पातिव्रत्य आचरण धर्माला अनुसरूनच होते., किंबहुना जास्त स्वच्छ ,निखळ,व पवित्र होते हे लक्षात येते.त्या मानाने वरील पाचही जणींच्या पती धर्मात निखळता , व पवित्रता काही अंशी कमतरीतच भासते. नव्हे ते तसेच आहे हे जाणवते.भौक्तिक अर्थी त्यात व्यभिचाराचे पडसाद स्पष्ट दिसून आणि तरी ही त्यांनापातिव्रत्य धर्मात मानाचे स्थान आहे यात नक्की काही गुढार्थ असणे शक्य आहे. नाहीतर तसे पहाता अहिल्या अत्यंत श्रेष्ठ पद्धतीने आपला पत्नीधर्म निभावत होती. तिला आपले पती गौतम ऋषी यांच्या व्यतिरिक्त परपुरुष स्पर्शही अधर्म होता .पतिव्रता धर्म निभावण्या व्यतिरिक्त त्या अत्यंत भावूक ,धार्मिक प्रवृतीच्या व उच्च अध्यात्मिक पातळी गाठलेल्या अश्या पतिव्रता स्त्री होत्या. तरीही त्यांच्या वर इंद्र देव मोहीत झाले व अहिल्येला प्राप्त करण्यासाठी त्यांनी मायेचा व्यापारी उद्योग केला होता. त्यामुळे गौतामांच्या शापाने अहिल्येची शिळा झाली हा इतिहास सर्वाज्ञात आहे आणि तरीही अहिल्या महापतिव्रता का? हा प्रश्न साध्या व्यक्तीला पडणे साहजिकच आहे. सीता ही एक पत्नी व्रती श्रीरामाची पतिव्रता अर्धांगिनी अत्यंत आदरणीय व पूजनीय ,देवतुल्य . तिचे रावणाने अपहरण केले. त्याच्या कैद्येत कित्येक दिवस ती होती .तिचे अपहरण करून तिच्याशी लग्नाचा कुटील घाट घालण्याच्या कारस्थानाचाच भाग होता. परपुरुषाकडे अनेक दिवस राहिल्याने ती अपवित्र व अशुद्ध गणली गेली. जनतेच्या व धर्माच्या नजरेतून हे अयोग्य म्हणून रामाने तिचा त्याग केला तिला वनवासात धाडले ,तिथेच तिने लव व कुश यांना जन्म दिला. तारादेवी ही तर २७ नक्षत्रांची अधिष्ठात्री देवता .तिच्या यौवनात ज्येष्ठ ग्रह गुरु बृहस्पती तिच्यावर मोहीत झाले. त्या मोहापोटी त्यांनी तिच्याशी विवाह रचला .विवाहित असूनही तारादेवीचे मन २७ नक्षत्रात परिभ्रमण करण्याऱ्या चंद्राकडे आकर्षित झाले. मन गुंतल्यामुल्ये तिने स्वत:चे हृदय व स्वत:ला चंद्राच्या हवाली केले. हे असे आचरण धर्मबाह्य असूनही तिची पंच पातीव्रतेमध्ये गणना केली जाते व ती त्यासाठी पूज्य अशी आहे. द्रौपदी तर पंच पांडव यांची प्रिया होती व तिने अत्यंत आत्मीयतेने त्यांच्याशी संसार केला. खरे तरं तिला अर्जुनाने स्वयंवरात जिंकले होते, वरले होते. पण तिने संसार त्याच्या इतर भावांशीही इमाने इतबारे केला व त्या सर्वांचेही तिच्यावर तेवढेच प्रेम होते. तीही फक्त अर्जुनाशीच "एक"निष्ठ न राहता ती" पंच"निष्ठ "पांचाली"झाली आणि तरीही महापतिव्रता म्हणून ती महापातीव्रतांमध्ये स्थानमान्य झाली. मन्दोदरीसुद्धा रावणाची पतिव्रता म्हणून प्रसिद्ध आहे. रावणाच्या बाबतीत ती आपला पत्नीधर्म निष्ठेने पाळत होती. पण तिलाही वाली पासून "अंगद "जन्मला होता. ती वालीची पत्नी होती. रावण वधानंतर ती बिभीषणाची पट्टराणी झाली. एकाच जन्मात तिने तीन जणांशी संसार केला.हे हिंदू धर्माविरुद्ध आहे. आणि तरीही ती महा पतिव्रता म्हणून पूज्य आहे. हा जर पाचही पातीव्रतांचा इतिहास लक्षात घेतला तरं सामान्य हिंदू गोंधळून गडबडून जाईल. त्यांना पडेल कि पतिव्रता धर्म लौकिक अर्थाने भ्रष्ट होऊनही ,त्यांना अनुसूया , सावित्री यांच्याही पेक्षा श्रेष्ठत्व मिळून वरचे व मानाचे स्थान प्राप्त होण्याचे काय कारण असावे? श्रीपाद्प्रभूंनी नेमके याचे धर्म सूक्ष्मास अनुसरून व कर्म चक्र सिद्धांत परिणामांच्या आधारे उचित व योग्य विवरण केले आहे. जीव परिणाम दशेत अनेक जन्म घेत असतो.८४ लक्ष योनींच्या जीवन मृत्यूच्या चक्र पाशात गुरफटून मोहमायेच्या अज्ञान्मयी आवरणात फिरत असतो. त्यात तो जीव मनुष्य जन्मात कधी स्त्री तरं कधी पुरुष जन्म ,आपल्या कर्मानुसार , घेत असतो .मानव जन्माव्यातीरीक्त पशु-पक्षादिंचा जन्म पण घेत असतो. स्त्रीने एक पतिव्रत व पुरुषाने एक पत्नीव्रत असले पाहिजे त्यामुळे बहुभार्या व बहुभार्तृत्वा निंदनीय आहे.एखाद्या पुरुषाने विनाकारण पत्नीस त्रास दिल्यास तो सप्त जन्म पर्यंत विधुर होतो.एखाद्या पुरुषाने चारपांच स्त्रियांशी विवाह केल्यास असे पुरुष स्त्री जन्म घेतात व त्या स्त्रिया त्यांची कामवासना व संस्कार क्षीण न झाल्याने पुरुष जन्म घेउन त्या या जन्मात स्त्री झालेल्या त्या पूर्व जन्मीच्या पुरुषाचा उपभोग घेतात.तेच उलटपक्षी एखाद्या स्त्रीच्या बाबतीत घडू शकते. माझ्या कडे ज्योतिष विचारण्यासाठी अशा अनेक केसेस येतात. काहींचे संसार सुरळीत चालले असूनही घरची श्रीखंड पुरी सोडून बाहेर पाणी पुरी खात असतात. तरं अनेक कमनशीब्यांना ना श्रीखंड ना पाणी पुरी लाभत असते अशा सर्व प्रश्नांची उकल पान महा पतीव्रतांच्या जन्म मरणाच्या कर्मविपाक सिद्धांतांच्या माध्यमातून केलेल्या विवरणातून केलेल्या खुलाशातून सुज्ञाच्या लक्षात येतेच पण अनुषंगाने येथे सांगणे योग्य ठरेल की यासाठी ज्योतिष शास्त्राचा उचित उपयोग तरं योग्यच आहे (अर्थात ज्योतिषी सुशिक्षित व योग्य हवाच )पण भगवान शंकरांनी सांगितलेली अद्भुत व गुप्त नाडी संहिता पण आहे नाडी संहिता हि भगवान शंकरांकडून १८ ऋषींनी ऐकली त्यांनी त्यांना कळली तशी लिहून ठेवली. त्यामुळे १८ संहिता - भृगु , अगस्त्य ,रावण इ- प्रसिद्ध आहेत.यातील अगस्त्य नाडी संहितेच्या प्रचार-प्रसाराचे अनमोल कार्य आमचे मित्रवर्य श्री प्रकाशजी खळदकर करीत आहेत. नाडी ज्योतिष हा वेगळ्या व संपूर्ण लेखाचा विषय आहे. असो हा कालचक्राचा प्रभाव आहे, कर्मवासना आहेत हे सर्वसामान्यांना पटतेच असे नाही. याच सिद्धांतानुसार पंच पतीव्रतांच्या पातीव्रताधार्माचे निरुपण व विवरण श्रीपाद चरीत्रामृतात केले आहे. अहिल्येवर इंद्र मोहीत झाल्याने तिच्या प्राप्तीसाठी इंद्राने ,अहिल्येस एकटी गाठण्यासाठी , प्रथम मायेने कुकुट रूप धारण करून पहाटेच्या आधीच बांग दिली.पाहत झाली असे समजून गौतम ऋषी आपल्या नैमितीक साधना अनुष्ठान करण्यास गेले . पण अहिल्या एकटी असूनहि इंद्र तिला स्पर्श करू शकत नव्हता .तिच्या पातिव्रत्याची ताकतच तशी होती त्यातूनच तिची अध्यात्मिक पातळी उच्च कोटीची असल्याने तिचा मोह अथवा हव्यास करणे अशक्य आहे हे इंद्राच्या लक्षात यावयास वेळ लागला नाही .पण त्याची मोह ,वासना आवरण्यापलीकडे गेलीली असल्याने ती शमवण्यासाठी त्याने मायेने मायावी अहिल्या निर्माण केली आणि तिचा उपभोग घेऊ लागला नेमक्या त्याच वेळी गौतम महामुनी आपल्या अनुष्ठानाहून ,अवेळी तेथे गेल्याने ,परत आले व त्यांनी मायावी अहिल्येला इंद्राच्या बाहुपाशात पहिल्याने ते क्रोधीत झाले व खऱ्या अहिल्येला तिची काहीही चूक नसताना ,कारण गौतम यांच्या आगमनानंतर मायावी अहिल्या लुप्त झाली होती, शिळा होण्याचा शापदिला. त्यावर अहिल्याच क्रोधीत कारण तिचे पातिव्रत्य भंग झालेलेच न्हवते.त्यामुळे तिनेच उलट शाप दिला. गौतम मुनींना योगसामर्थ्याने सत्य लक्षात आल्यावर त्यांनी तिला रामाकडून उद्धार होण्याचा उ:शाप दिला. अहिलेच्या शापामुळे गौताम ऋषी १२ वर्ष भ्रमिस्तावस्थेत वावरले ,मग श्री शिव शंकरांची आराधना करून स्थिर झाले. थोडक्यात अहिल्या व तिचं पातिव्रत्य भंग झालेच नाही उलट पक्षी तिच्या पातीव्रत्यामुळेच इंद्राला दुधाची तहान ताकावर भागवावी लागली.या तिच्या पातिव्रत्याच्या ताकतीमुळेच तिला महापतीव्रतांमध्ये मानाचे स्थान प्राप्त झाले. देव गौतामांच्या शापामुळे इंद्र सहस्त्राक्ष झाले. इंद्रदेव शापामुळे पांडव म्हणून जन्माला आले.द्रौपदी ही पांच पांडवाची पत्नी "पांचाली" झाली. तीपण पांच महापतीव्रतांमध्ये माननीय स्थान प्राप्त करती झाली .पांचाली असूनही पतिव्रताहोण्यामागेही आध्यात्मिक गूढ आहे. द्रौपदी ही पूर्वजन्मीची मेधावती ,जिचे लहानपणीच मातृछत्र पारखी झालेली ,शिवभक्त होती. दुर्वास ऋषींनी (जे स्वतः महान शिवभक्त आहेत) तिला तिच्या उध्धारासाठी पुरुषोत्तम मास व्रत करण्यास सांगितले पण मी शिवभक्त आहे मला पुरुषोत्तम व्रत करावयाचे नाही असे म्हणून तिने ते हसण्यावारी नेले . असे तिला दुर्वासांनी पांच प्रसंगी सांगितले आणि पाचहि वेळी तिने ते हसण्यावारी नेले . नंतर तिने तपस्चर्या करून शिव शंकरांना प्रसन्न करून घेतले व मला धार्मिक ,पराक्रमी, बलाढय ,शूरवीर व देखणापती मिळूदे असा वर मागितला पण एका व्यक्तीत हे सर्व गुण असणे कठीण असल्याने व दुर्वासांना पांच वेळा हसण्यावारी नेल्याने , तुला पुढील जन्मात पांच पती प्राप्त होतील असा वर दिला . तीच मेधावती द्रौपदी चा जन्म घेउन पांचाली झाली .इंद्राने पांडवाचा जन्म घेतला तर इन्द्रपत्नी शचीदेवीचा अविर्भाव यज्ञ कुंडात द्रौपदीच्या रुपाने झाला . तीचा जन्म अयोनिज होता .शापग्रस्त इन्द्र पांच पांडव म्हणून जन्मला.पाच रूप पाच मनं असली तरी त्यास आधारभूत असलेला आत्मा एकच ,त्यामुले अणि द्रौपदी अयोनिज असल्याने तिला पातीव्रात्य भंगाच पातक नाही. सीता माता तर साक्षात देवीरामाबरोबर मानव जन्म घेऊन ,जगाला मानवी आदर्शाचा पाठ घालून देण्यासाठी त्यांचा जन्म झालेला , खरया सितेस लंका गमनापूर्वी अग्नि देवतेने आपल्या गर्भात लपवले आणि मत्याच्या सीतेस रवानाने लंकेस नेले. लंकदहना नन्तर सितामातेने अग्नि प्रवेश केला त्यात मायावी सीता गुप्त झाली आणि खरी सीता परत आली. अश्यारीतीने तीची शुचिर्भुतता व पातीव्रत्य अबाधित राहिले व मान्यताप्राप्त झाले. तारादेविच्याबतीत पण असेच आहे.भुचक्रातील बारा राशिन्मध्ये गुम्फ्लेल्या २७ नक्शात्राची अधिष्ठात्री देवता तारादेवी ,तीच्या भर यौवनात वरिष्ठ ग्रह गुरु यांची अधिष्ठात्री देवता असलेले बृहस्पती हे तीच्याकडे आकर्षित होउन तीच्याशी विवाहबद्ध झाले .ती यौवना व ते वृद्ध त्यामुले ते तर यौवनास्थेतील तृप्त करण्यास कमी पड़त होते. हा विषय धर्मं विरुद्ध आहे आणि म्हणून विवाह समई घेतलेल्या शपथेचे उलंघन झाल्यास क्षति होंत नाही.ब्रुहस्पतिचा मोह व आकर्षण एकतर्फी असल्याने त्यांच्या बाबत टीला कधीच पतीत्व भाव निर्माण झाला नाही .या उलट सकल धर्माचे ज्ञान असुनही गुरु ब्रुहस्पती धर्म बाह्य आचरण केले तारादेवींच्या शरीरातील पेशी आणि जीवाणुन चे तीच्या मन प्रवृतीं नुसार बदल घडत गेले .२७ नक्षत्रात , ज्यांची ती अधिष्ठात्री देवता आहे ,सृष्टि नियमां प्रमाणे परीभ्रमण करणाऱ्या चंद्राचे रूप तीच्या मनात स्थीर झाले .व आपले ह्रदय तीने चंद्राधीन केले. प्रभावी बदल घडलेली तारा देवी व पूर्वीची तारादेवी भिन्न होत्या म्हणून चन्द्र+तारा मिलन धर्मबाह्य ठरत नाही. नक्षत्र भ्रमण हा चन्द्र धर्म आहे गुरुचा नव्हे. जर गुरुने असे केल्यास ते धर्मबाह्य ठरेल .कुठल्याही धर्म विरुद्ध कार्याची अधोगती होते .म्हणुनच२७ नक्षत्रांची अधिष्ठात्री देवता तारा देवी चंद्रमंडलाचे अधिष्ठान दैवत चंद्रास पावणे हा योग्य धर्म होय .या सूक्ष्मधर्मानुसार तारा देवी ही महापतीव्रताच ठरते. मंदोदरी ही रावण याची पतीव्रता म्हणून सर्वांना माहित आहे. पण रावण धरून तीने एकूण तीन पती केले होते हे कदाचित सर्वश्रुत नसावे आणि ते म्हणजे वाली ,रावण, व बिभीषण . जन्म चक्र फेरयाच्या पूर्व्जन्मंतारी मंदोदरीचा पुरुष जन्म होता तीला तीन पती होते व त्या पुरुष जन्मात तीला चंचल,दुष्ट ,व मृदु स्वभावाच्या तीन विवाहित बायका होत्या . इह जन्मात त्या तीन स्त्रीया पुरुष होउन तीचे पती झालें. चंचलेने वानर जन्म घेतला तो वाली वानराचा ज्याच्या पासून तीला "अंगद"हा पुत्र झाला.तद नन्तर दुष्ट प्रवृत्ती ने रावणाचा जन्म घेतला होता त्याची ती भार्या जाहली. रावण संहार नन्तर मृदु स्वभावाच्या स्त्रीने जो बिभीषण म्हणून जन्मला त्याची पटराणी झाली. परन्तु तीघांची पत्नी असतांना तीच्यातील जीवाणु भिन्न होते म्हणून मंदोदारीसुद्धा महापतीव्रता आहे. असे हे कालचक्राचे गणित आध्यात्मिक रहस्यान्नी परिपूर्ण आहे. कळल तर त्याच्या इतक दुसर काही सोप्प नाही व नाही कळल तर त्याच्या इतक काहि कठीण नाही ... कालचक्र हे कर्मानुसार स्पंदन निर्माण करत असते. ती स्पंदन चांगली व वाईट असतात सतकर्म आनंदमय स्पंदन(vibrations)निर्माण करतात तर दुष्कर्म दुष्ट व पिडा पूर्ण स्पंदन निर्माण करतात मान्साहरासाठी वध केलेली शेळी वाईट स्पंदन सोडते तीची हाय ,हळहळ सूड भावना निर्माण करते व मनुष्य जन्म घेउन मास भक्षण करणार्या माणूस ज्याची इह जन्मी शेळी झालेली असते त्याचे मास भक्षण करते .असा हा कालचक्र फेरा ,लक्ष चौर्यांशीचा फेरा. त्यातून सुटका करावयाची तर क्षमा , सत्कर्म सद्भाव ,दया श्रद्धा व शरणागती भाव अत्यावाशक .सात्विकता शेळीस पहिल्यावार्ही क्षमाशील भावनेपोटी मांस भक्षण करण्यास प्रवृत्त करत नाही .अशा वेळी तो जर पूर्व पूर्वजन्मीचा शेळी असताना त्याचा वध झाला असेल तर या जन्मिच्या क्षमाशील भावने मुळ प्राण दानाचे पुन्य लाभून त्याचे कालचक्र थांबते . -- पंच पातीव्रतान्बद्दल व इतर अनेक बाबींवर अनेक प्रवाद व मत प्रवाह आहेत.त्यालाआध्यत्मिक सामाजिक , व धार्मिक तसेच शब्दार्थ ,मतिथार्त, भावार्थ व परमार्थ असे चार अर्थ ग्राह्य अस्तात व काहि कथाना सामान्यांना आकर्षित करण्यासाठि काहि मुद्दे अस्तात.त्याच प्रमाणे वेगले मत प्रवाह(interpretation ) असतात .त्यातील आध्यात्मिक अर्थ व तत्वज्ञान समजून घेणे महत्वाचे आहे ,आणि अश्या प्रकारचे विवरण दुसऱ्या कुठल्याही धर्मग्रंथात नाही व त्या प्रवाहातील व अनुसारयांना याचा उलगडा होत नाही ,त्यांची कुवत नसते , काळात नाही, कळले तरं पटत नाही ,व वळत नाही.(उदा. शांती म्हणजे नक्की काय हे पाश्चात्यांना काळात नाही शांती ही बाहेर नसते तर अंतर्गत असते व ती बाहेर शोधली जाते. खाली माझी अंतर राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त कविता पहा जिला Inter national Library of Poetry ,U .S .चा पुरस्कार प्राप्त आहे ) म्हणून ते सारासार पाने नाकारले जाते. व आपली आजची पिढी पण या पासून दूर आहे . तात्पर्य वरील लेखन १३ व्या शतकातील आद्य गुरु चरीत्रातील विवरणावर आधारीत आहे हे कृपया लक्षात घ्यावे. -- SILENCE, is, WITHIN......
Silence speaks always conveys something & is still speechless
Silence saves Energy, makes one SOUND, yet soundless. Silence is a safety-zone of communication, it is GOLDEN. It is a means through which one can have unison. saying well produces laugh, doing well produces silence. Silence is peace, a bliss, it adds to resilience. If one understands silence, one understand everything by any standard. Man is mini universe, silence is a window between his inner & outer world. Silence is always within, never without. Silence is AWARENESS no doubt, One need not put effort to be silent, it is effortless. To be effortless is to be AWARE, so silence is ABSOLUTE AWARENESS. There was only silence before the Big Bang from which this world was born. That is why Vedic Religion puts Shanti (Silence) before Om, Shanti Om. Om - one of the thousand of meanings of Om is Big Bang. Dr .Sanjay Pandurang Honkalsedr.sanjay honkalse.
|
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment